सावंतवाडी :माजगाव येथे जीर्ण झालेला विजेचा खांब दुचाकीवर कोसळला. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने दुचाकीस्वार दत्तात्रय परब यात बचावला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला मोठी कोणतीही दुखापत झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान, जीर्ण झालेले पोल तात्काळ हटवण्यात यावे अशी वारंवार मागणी करून देखील महावितरणचे अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यात 108 वरील ड्रायव्हर दादा गवस देखील बालंबाल बचावले. त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी देखील मदत केली. सावंतवाडी शहरांमध्ये अशाच प्रकारे जीर्ण झालेले पोल अजूनही बदलले गेले नाहीत. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडवून लोकांचे प्राण जाऊ शकतात. याला जबाबदार कोण ? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. या मदतकार्यात सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, प्रसाद परब आदींसह उपस्थितांनी सहकार्य केल.