सिंधुदुर्ग : रस्त्यांसाठी निधीच्या विषयावरून नियोजन समितीत राजकीय कुरघोडी पहायला मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्यांसाठी म्हणावा तसा निधी आला नाही. असे सांगत आमदार वैभव नाईक यांनी रवींद्र चव्हाण आणि नितेश राणेंना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे, दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी निधी मिळाला. त्यामुळे राजकारण कोणी करू नये. राजकारण आम्हाला सुद्धा करता येत असे सांगत वैभव नाईक यांना टोला लगावला. यावेळी आमदार नाईक यांनी दीपक केसरकर "त्यावेळी" आमच्यासोबत होते असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. तर वैभव नाईक हे व्यवसायिक म्हणून निधीची मागणी करतात की आमदार म्हणून करतात ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला.