सावंतवाडी : निर्भय, निर्भीड वातावरणात निवडणुका व्हाव्यात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वरती कुणाच्याही गदा नकोत अस मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केल. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका सुरू असून मुक्त वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात याची जबाबदारी पोलीस आणि निवडणूक आयोगाची आहे. प्रत्येक बाबींकडे दक्षतेने पाहणं आवश्यक आहे. मग, ते पत्रकार असतील किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांना व्यक्त होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे.