देवगड - जामसंडेत विहिरींनी गाठला तळ !

अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट
Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 28, 2024 13:30 PM
views 145  views

देवगड : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे ऐन मे महिन्याच्या आधीच देवगड तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागात देखील भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे.भूगर्भातील पाणीसाठा सुमारे २०० ते २५० फुटाच्या खाली पोहोचला आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी कमी झाले तर विहिरींनी पण तळ गाठला आहे. अशी भयानक स्थिती दिसत आहे.

देवगड व जामसंडे ही दोन शहरे दहिबाव अन्नपूर्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत में महिन्याच्या आधीच नदीपात्रातील पाणीसाठाच कमी झाल्यामुळे देवगड व जामसंडे येथील नागरिकांना आता दोन दिवसाने पाणीपुरवठा होणार असल्याचे नगरपंचायतने जाहीर केले आहे. देवगह तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांमध्ये यावर्षी पाणीटंचाईला तोड देण्याची वेळ आली आहे. यंदा वरुणराजाने अवकृपा केली आहे.

शिरगाव पाडागर व दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीतील पाणी पातळी घटली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा ही योग्य प्रमाणात झाला नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये तीव्र पाणीटंचाईचे सावट जनतेवर येण्याची चाहूल लागली आहे. त्यामध्ये देवगड व जामसंडे या दोन शहरांमध्ये त्याची तीव्रता जास्त जाणवू लागली. बहुतांशी भागांमध्ये बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जात आहे.

सर्वसाधारणपणे १५० ते २०० फुटापर्यंत बोअरवेलचा पाणीसाठा असल्याचे दिसते. या पाणी पातळीपर्यंत मे महिन्यापर्यंत किमान पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते. परंतु यावेळी मार्चमध्ये २०० फुटाच्या खाली पाण्याची पातळी गेली असे चित्र निर्माण झाल्यामुळे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात ऐन मार्च महिन्यामध्येच जाणवू लागली आहे. देवगड व जामसंडे शहरासाठी

दहिबाव येथील अन्नपूर्णा नदी पात्रातून होत आहे पाडाघर येथील पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे दहीबाव अन्नपूर्णा नदी पात्रातून पाणीपुरवठा देवगड जामसंडेसाठी करण्यात येतो. दरदिवशी या नदीपात्रातून २२ तास पाणी उपसा केला जातो, त्यातून सुमारे २० लाख लिटर पाणी खेचते जाते. हे उपलब्ध पाणी देवगड व जामसंडे येथे सोडण्यात येते. आजच्या स्थितीला नदी पात्रातील पाणीसाठा घटत चालल्यामुळे १० ते ११ लाख लिटर पाणी उपसा केला जात आहे. पाणीच कमी झाल्यामुळे दोन दिवसआड असा पाणीपुरवठा देवगड नगरपंचायतच्या माध्यमातून केला जाणार असल्याची सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी तब्बल आठ दिवसाने पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये शिरगाव पाडाघर योजनेतील तांत्रिक बिघाड तसेच अन्नपूर्णा नदीपात्रातील कमी पाणीसाठा ही प्रमुख कारणे होती. गेल्या वर्षी अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम केल्यामुळे काही

प्रमाणात नदीपत्रातील पाण्याची पातकी वाढली होती. यावर्षी प्रचंड उष्णता व कमी पाऊस या दोन मुख्य कारणामुळे पाणीपातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. वेत्या एप्रिल मे महिन्यामध्ये बहुतांशी गावामध्ये पाणीटंचाईचे अस्मानी संकट उभे राहणार आहे. तेथील विहीरीनी आताच तळ गाठला आहे. त्यातच दरवर्षी प्रमाणे देवगड व जामसंडे या शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा आठ दिवसाने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार असेच दिसत आहे. या भीषण परिस्थितीमुळे लोकांवर पाणी विकल घेण्याची वेळ आली होती. दरवर्षीच येथील जनतेला पाणी विकत घेण्याची वेळ येते. परंतु यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाही. दहिबाव पाणी योजनेच्या पंपिग यंत्रणेत सातत्याने बिघाडा होत असतात त्यातच जलवाहिनी बहुतांशी भागांमध्ये नादुरुस्त झाल्यामुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणात आहे. नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी

उपलब्ध होताना दिसत नाही मुळातच दहीबार अन्नपूर्ण नदीपात्रातून जलवाहिनीच्या माध्यमातून केला जाणारा पाणीपुरवठा हा नेहमीच अडचणीचा मुद्दा ठरलेला आहे या पात्रातील पाणी पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा केला जातो. येथील ग्रामपंचायत पंपिंग करून पाणी खेचत असतात एकीकडे देवगाड व जामसंडे व पंचक्रोशीतील गावे असा पाणीपुरवठा या नदीतून होत असल्याने येथील पाणीसाठा हा नेहमीच कमी होतो पात्रातील पाणी कमी होते. शिरगाव पाडाघर येथील नदीपात्र बारमाही पाणी वाहत असते. परंतु हे पाणी योग्यप्रकारे साठवून करण्याची उपायोजना अद्यापही केली नसल्यामुळे देवगड जामसंडे व इतर गावांना मुबलक प्रमाणात पाणी देता येत नाही उन्हाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक आहेत अशाप्रसंगी आतापासूनच पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामपंचायत व नगरपंचायतीला जनतेला पाणी कशा प्रकारे द्यावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.