सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या योग्य पाठपुरावा मुळेच हा प्रश्न सुटला आहे.
त्यामुळे आता आंबोली- गेळेतील लोकांना त्याचा फायदा होणार आहे.या निर्णया साठी शिवसेना आंबोली विभागप्रमुख विलास गावडे आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.