नारुर गावात पावसाने झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईकांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी...!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 06, 2023 17:13 PM
views 751  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नारुर कर्याद नारुर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने  नदी नाल्यांना पूर येऊन शेतीचे, बागायतींचे नुकसान झाले. त्याचबरोबर सरनोबतवाडी येथील साकव देखील कोसळला आहे. याठिकाणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी तात्काळ भेट देत पाहणी केली.यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार अमोल पाठक हे पण या पाहणी वेळी उपस्थित होते. याप्रसंगी  प्रांताधिकारी व तहसीलदार यांना नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई  देण्याची सूचना आमदार वैभव नाईक यांनी केली. कोसळलेल्या साकवाच्या ठिकाणी देखील नवीन साकव उभारण्याबरोबरच तातडीची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी,नारुर क नारुर सरपंच वैष्णवी मेस्त्री, उपसरपंच मुकुंद सरनोबत,तलाठी नंदकिशोर परब,कृषी सहाय्यक धनंजय कदम, विभाग प्रमुख नरेंद्र राणे, वेताळबांबर्डे उपसरपंच प्रदीप गावडे,संजय आचरेकर,शिवाजी कदम,आबा तळेकर,शंकर सुद्रिक आदींसह  नारुर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.