कबुलायतदार गावकर प्रश्न अखेर मार्गी | मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी मानले आभार
Edited by: विनायाक गावस
Published on: July 04, 2023 14:44 PM
views 266  views

सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. आज झालेल्या  मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच हा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आता आंबोली- गेळेतील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. 

यासाठी सातत्याने पाठ पुरवठा करणारे करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली, स्थानिक आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे ही आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांनी आभार मानले आहेत.