कणकवली : सावडाव गावातील एस टी वाहतूक सुविधा सुरळीत वेळेवर होण्यासाठी व एसटी वाहतूक वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी शिवसेना उपविभाग प्रमुख श्री व्यंकटेश वारंग ग्रामपंचायत सदस्य श्री अजय जाधव सामाजिक कार्यकर्ते श्री वैभव सावंत सुहास पाताडे अशोक वारंग संतोष तेली यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी वाहतूक नियंत्रक दिगंबर पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भविष्यात एस टी बस वेळेवर सोडण्यात येईल असे आश्वासन विभाग नियंत्रण यांनी दिले.
तसेच गणेशोत्सव काळात विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी देखील निवेदन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहीते यांना देण्यात आले. त्यांनी देखील लवकरच सावडाव गावातील विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कणकवली मंडळाला जोडण्यात येणार असे आश्वासन दिले.