बांधकाम खात्याला किती बळी हवेत ?

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2024 07:59 AM
views 51  views

सावंतवाडी : या आठवड्यात दोन अपघात आंबोली घाटामध्ये झाले. एक कॅन्टर दरीत कोसळला तर दुसरा अपघातात कार लॉरी यांच्यामधील झाला. या अपघातामध्ये  वाहन चालक तसेच अन्य व्यक्तींना जबर मार बसलेला आहे. गेले दोन महिने आम्ही घाट रस्त्यातील भ्रष्टाचाराबाबत पाठपुरवठा करत आहोत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे सार्वजनिक बांधकाम खात्याने दाखल करायला हवेत अशी मागणी करत आहोत.

परंतू, याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते उदासीन दिसत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना जेरबंद करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकामच्या याच अधिकाऱ्यांमुळे घाट रस्त्यातील कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचं काम कोणी करत असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा बबन साळगावकर यांनी दिला आहे.