सावंतवाडी : राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली. यावेळी गेल्या 4-5 वर्षांत अनेकदा कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा अनेक संकटांनी बेजार केले आहे. या अनेक संकटांत सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना पाठपुरावा करूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबत लक्ष वेधल.
संकटग्रस्त शेतकरी बांधवांसोबत अर्चना घारे-परब यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली. महसूल विभागाकडून लवकरात लवकर आवश्यक कारवाई करून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सरचिटणीस हिदायतुल्ला खान, चिटणीस समीर सातार्डेकर, गौरांग शेर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.