सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल १२१ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली.त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच घडलेल्या घटनेची डॉक्टरांकडून माहिती घेतली.
या अश्या अचानक आलेल्या परिस्थितीमध्ये सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन अगदी युद्धपातळीवर प्रयत्न करून या मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल सर्व डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक आहे असं मत त्यांनी व्यक्त केल. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत आहे लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाईल. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर 48 तास लक्ष ठेवून आहेत असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर एवाळे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ पांडुरंग वजराटकर, डॉ चौगुले, डॉ .सावंत, अँड सायली दुभाषी, नितेशा नाईक आदी उपस्थित होते.