
वेंगुर्ले : दिनांक ३१ मे रोजी अणसूर ग्रामपंचायत येथे पुण्य शोल्क अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला जेष्ठ नागरिक अंगणवाडी सेवा निवृत कर्मचारी शशिकला भालचंद्र गावडे यांच्या हस्ते हार घालून पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांनी सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त सर्वाना शुभेच्छा देऊन महिलांना मार्गदर्शन करताना पुण्यश्लोक अहिल्याबाई यांची विचार सरणी आणि त्यानी केलेल्या लोकभिमुक कामाची आठवण करुन दिली. तसेच आपल्याला त्यांच्या सारखे होता नाही आले तरी आपण त्यांची विचारसरणी, विचारधारा डोळ्या समोर ठेऊन आपणही तसे समाजात काम करावे असे संभोदून गावातील महिलांचा समाजात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सन्मानित महिला जेष्ठ नागरिक सेवा निवृत शशिकला भालचंद्र गावडे, अनुष्का अंकुश तेंडोलकर, विनया विश्वनाथ गावडे या तिन्ही महिलांनी उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांना गौवराविण्यात आले. या वेळी बहुसंख्य ग्रामस्थ, महिला वर्ग, भाजप पदाधिकारी आनंद (बिटू) गावडे, शक्ती केंद्र प्रमुख गणेश मनोहर गावडे, बूथ प्रमुख वामन गावडे, ग्रामअधिकारी सायली सातोसे, उपसरपंच, वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, वामन गावडे, पदाधिकारी देऊ गावडे, प्रकाश गावडे, शिला देवूलकर, स्वरांजली गावडे, रुचिता गावडे, अनिषा गावडे, अन्नपूर्णा गावडे, भक्ती गावडे, सायली गावडे, बहुसंख्य महिला ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.