सावंतवाडी : आंबोली-नांगरतास आजरा रोड येथे महिंद्रा थार गाडी झाडावर आढळल्याने उस्मानाबाद येथील दत्ता जाधव (वय 35) हा युवक जागीच ठार झाला. तर 6 जण जखमी झालेत. उस्मानाबाद येथून गोवा येथे हे युवक जात असताना झाडावर थार आदळून हा अपघात झाला.
ड्रायव्हर बाजूस बसलेला दत्ता व्यंकट जाधव हा मयत झाला असून इतर ६ युवक जखमी झाले आहेत. त्यातीत दोनजण गंभीर जखमी आहेत. तर इतर चार जण किरकोळ जखमी झालेत. जखमी झालेले महादेव भगवान बांगर (वय ३२)धाराशीव, गणेश दिलीप साळुंखे (वय २२) अहमदनगर, बालाजी भगवान बांगर (वय ४०) धाराशीव, सुनिल कृष्णा कुलभैया (वय ३१)बीड, नवनाथ विठोबा जाधव (वय ३९) बीड, विष्णू अंकूश बांगर (वय २२) धाराशिव अशी जखमींची नाव आहेत. अपघाताची माहिती वाहनचालकांनी आंबोली पोलीस स्थानकात दिल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. याठिकाणी उपचार करून बांबोळी येथे पाठवण्यात आले.