समाजातील शेवटच्या घटकांची काळजी करणारे मुख्यमंत्री

राणेंनी केलं कौतुक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 05, 2024 12:19 PM
views 41  views

मालवण : महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुती सरकारचे आरोग्य विषयक काम आदर्शवत असून समाजातील शेवटच्या घटकांची काळजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याला लाभले आहेत, अशा शब्दांत केंद्रीय उद्योग मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायणराव राणे यांनी कौतुक केले. केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायणजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रव्यापी आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना भाजपा पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे जंगी स्वागत करण्यात आले. 

दरम्यान, महाराष्ट्राचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डाॅ. श्रीकांतज शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य संवाद यात्रा सुरू आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विषयक कामाचे राणे साहेबांनी कौतुक केले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, आरोग्यदूत फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संपादक बाबा देशमाने, सचिव भगीरथ तोडकरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, शिवसेना मालवण-कुडाळ विधानसभा प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, मालवण (आचरा) तालुकाप्रमुख महेश राणे तसेच उपस्थितांशी मंत्री राणे यांनी संवाद साधला. आरोग्य संवाद यात्रा संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता कोकणात दाखल झाली आहे. या नंतर ही आरोग्य संवाद यात्रा पुणे, मावळ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली.