२५ वर्षांच्या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू

Edited by: दिपेश परब
Published on: February 27, 2025 20:11 PM
views 474  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला राऊळवाडा येथील रहिवासी व येथील बाजारपेठ मधील भाजी विक्रेता अतुल सुनील केरकर (वय-२५) याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज २७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल केरकर हा युवक वेंगुर्ला बाजारपेठ येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. आज २७ फेब्रुवारी रोजी अतुल भाजी विक्रीच्या ठिकाणी अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याला आजूबाजूच्या व्यवसायिकांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे दाखल केलेले होते. तेथे उपचारा दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला  मयत घोषित केले. काही दिवस अगोदर त्याच्या छातीत दुखत असल्याने त्यावर उपचार सुरू होते. मात्र अतुलचा आज अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबाला जोरदार धक्का बसला आहे. या घटनेबाबत वेंगुर्ला शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.