वैभववाडी : तालुक्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढला.मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची पडझड होऊन ४५हजारांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.मंगळवारी रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढला.या पावसाने तालुक्यातील कोकीसरे, उंबर्डे,एडगाव येथे घरांचे नुकसान झाले.यामध्ये कोकीसरे गावातील सुभद्रा दत्ताराम इमाले घराचे अंशतः ४०००, बाळकृष्ण सोनू जाधव घर १००००,दशरथ सोनू गुरव घर ७५००,दत्ताराम राजाराम किंजवडेकर २०५०, लक्ष्मी मधूकर रणशिवे ४५००,एडगाव येथील जयश्री जयेंद्र रावराणे यांच्या मंगल कार्यालयाचे छप्पर १५ हजारांचे नुकसान झाले.उंबर्डे कुंभारवाडी येथील लक्ष्मी भागोजी साळवी यांच्या घराचे ४५००रुपयांचे नुकसान झाले आहे.करुळ ,भुईबावडा घाटमार्ग सुरळीत आहे.परंतु कोल्हापुर मार्गावरील मांडुकली,लोंघे येथे पाऊस असल्याने वैभववाडी कोल्हापूर वाहतूक ठप्प आहे.