दुपारी १ पर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 33.91% मतदान

Edited by:
Published on: May 07, 2024 08:31 AM
views 98  views

सिंधुदुर्गनगरी :  लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 33.91% एवढे मतदान झाले आहे. तर सकाळच्या सत्रात सात ते नऊ या कालावधीत केवळ 8.29% एवढेच मतदान झाले होते.तर 11 वाजेपर्यंत 21.19 टकके मतदान झाले होते.

सकाळी नऊ वाजल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी दिसत असून, मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत या मतदारसंघात एकूण 21.19% एवढे मतदान झाले होते,तर दुपारी एक वाजेपर्यंत 33.91 टक्के एवढे मतदान झाले आहे. यात चिपळूण 37.09, रत्नागिरी 28, राजापूर 37.05%, कणकवली 31.59, कुडाळ 32.88 तर सावंतवाडी 36.65% एवढे मतदान झाले आहे.