डॉ. अमेय सुरेश गोडबोले यांना मध्य प्रदेश सरकारचा 'भारत श्री' पुरस्कार

Edited by: मनोज पवार
Published on: August 22, 2025 20:16 PM
views 34  views

कोकणच्या भूमीतील शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अमेय सुरेश गोडबोले यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे 'भारत श्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कमीत कमी मोबदल्यात आणि अनेकदा विनामूल्य ज्ञानदानाचे काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली.

हा पुरस्कार दरवर्षी मध्य प्रदेश सरकार आयोजित करते. देशभरातून विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. या वर्षी, पुरस्काराच्या पहिल्या फेरीत 300 हून अधिक लोकांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी अंतिम फेरीत केवळ 41 जणांना हा सन्मान मिळाला.

पुरस्कार वितरण सोहळ्याला लेफ्टनंट जनरल बी.एस. सिसिदोया, राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान मिळालेले एअर मार्शल चौधरी, तसेच पॅरालिम्पिकपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सत्येंद्र सिंह लोहिया (ज्यांनी इंग्लिश चॅनल आणि नॉर्थ चॅनल पोहून पार केले आहे) यांसारखे मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या राज्याने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील एका व्यक्तीचा सन्मान करणे, हा डॉ. गोडबोले यांच्यासाठी एक विशेष मान आहे. त्यांच्या या योगदानाला मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित होते.