
मंडगणड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच ‘प्रयोगशाळा सुरक्षा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून दोशी-वकील कॉलेज, गोरेगांव येथील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. बी. टी. विभूते हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभये होते. यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण, प्रा. शरिफ काझी, प्रयोगशाला सहायक श्री. रंजीत म्हाप्रळकर, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मुकेश कदम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले कार्यशाळा तर प्रा. शरीफ काझी यांनी प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून दिली.
मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. बी. टी. विभूते यांनी सांगितले की, योग्य सुरक्षा कार्यपद्धती एक जबाबदार प्रयोगशाळा संरक्षण संस्कृतीला प्रोत्साहन देते. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून संशोधक आणि विद्यार्थी आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेने प्रयोग करू शकतात. प्रयोगशाळेची सुरक्षा अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते व्यक्तींचे रासायनिक बर्न, विषारी वायु, आगीचे धोके आणि शारीरिक जखमांपासून संरक्षण करते. दुसरे म्हणजे प्रदूषण आणि प्रक्रियात्मक त्रुटी कमी करून प्रयोगांची अखंडता सुनिश्चित करते. सुरक्षित कामकाजाचे वातावरण राखण्यासाठी प्रयोगशाळा विविध सुरक्षा पद्धती लागू करावी. लॅब सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. रासायनिक गळती आणि स्फोटांमुळे दुखापत होऊ शकते किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्याने दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त, अयोग्य कचरा विल्हेवाट पर्यावरणास हानी पोहोचवू शकते शैक्षणिक संस्था आणि संशोधन सुविधांना सुरक्षेच्या उल्लंघनामुळे दंड होऊ शकतो. अशाप्रकारे, प्रयोगशाळेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने केवळ व्यक्तीच धोक्यात येत नाही तर वैज्ञानिक अखंडता आणि पर्यावरणीय घाटकही धोक्यात येतात. कोणतेही रसायन हाताळण्यापूर्वी, संभाव्य धोके, योग्य हाताळणी आणि आपत्कालीन उपायांबद्दल जागरूक आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. बी. टी . विभूते यांनी आग लागल्यास कशा प्रकारे विझवावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यकामचे सूत्रसंचालन प्रा. शरीफ काझी यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. संदीप निर्वाण यांनी मानले.










