संकष्टी चतुर्थी विशेष | संकटांपासून सुटकेसाठी करा बाप्पाच्या भालचंद्र रूपाची पूजा !

गणेशाची विशेष उपासना करून उपवास केल्यास संकट दूर होतात
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 11, 2023 11:37 AM
views 210  views

ब्युरो न्युज : चैत्र महिना 8 मार्चपासून सुरू झाला असून तो 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या महिन्यात कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी 11 मार्च रोजी आहे. या दिवशी गणपतीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. स्कंद आणि ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या तिथीला गणेशाची विशेष उपासना करून उपवास केल्यास संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. संकटांपासून सुटकेसाठी बाप्पाच्या भालचंद्र रूपाची पूजा करावी. 

 

संकष्टी गणेश चतुर्थी व्रत शनिवारी येत आहे. या दिवशी चतुर्थी तिथी दिवसभर राहून रात्री 10 वाजेपर्यंत राहील. संकष्टी गणेश चतुर्थी व्रत फक्त चंद्रोदय व्यापिनी चतुर्थीला पाळले जाते. म्हणजेच चतुर्थी तिथीला संध्याकाळी चंद्र उगवला, तर त्या दिवशी उपवास करावा. या व्रतामध्ये सूर्योदयाच्या वेळी कोणती तिथी आहे याचा विचार केला जात नाही.


संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. हे व्रतही नावाप्रमाणे आहे. म्हणजेच ते सर्व संकटांना निवारणारे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते.


संकष्टी चतुर्थी व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी पाळतात. त्याचप्रमाणे, अविवाहित मुलीदेखील चांगला पती मिळावा म्हणून दिवसभर उपवास करून संध्याकाळी गणपतीची पूजा करतात.