रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आम्हाला मिळायला हवा : उदय सामंत

Edited by: भरत केसरकर
Published on: March 14, 2024 14:33 PM
views 231  views

मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे मोठी ताकत असून हा मतदारसंघ आम्हाला मिळायला हवा. असे सूचक विधान शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केल आहे. ते मीडियाशी बोलत होते.हा लोकसभा मतदारसंघात हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्ष शिवसेनेच्या धनुष्यबाणावर येथे खासदार निवडून येत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला अर्थात आम्हाला मिळायला हवा. अशा पद्धतीचे सूचक विधान उदय सामंत यांनी केला आहे. या मतदारसंघावर अद्याप भाजपने आपला उमेदवार जाहीर केला नसून शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला जातो की शिवसेना? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.