विनायक राऊत आमिषाला बळी नाही पडले : वैभव नाईक

Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2024 14:42 PM
views 51  views

कुडाळ : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे. माणगाव खोऱ्यातील लोक नेहमी शिवसेनेसोबत राहिलेत, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्न विचारणाऱ्यांना माणगावची सभा उत्तर आहे.

दहा वर्षांत मोदी काही करू शकले नाही. आम्ही देखील त्यांच्या जाहिरातींना फसलो. विनायक राऊत हे सामान्यातील खासदार आहेत. अनेक विकासकामे त्यांनी या भागात केली. कुणाच्या आमिषाला ते बळी पडले नाही. राणेंना केवळ ठाकरेंवर बोलायला भाजपने ठेवलं आहे. पहिल्या रांगेतील विद्यार्थी १३ व्या यादीत बसवलं आहे अशी टीका उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर केली. तर विनायक राऊत यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं. माणगाव येथील विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.