कुडाळ : पंतप्रधान मोदींच्या काळात देशात 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर एकट्या महाराष्ट्रात 70 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोदी सरकारने मागील नऊ वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना एकही पॅकेज दिले नाही, महागाईवर या सरकारचे नियंत्रण नाही, या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट सरकार आहे. देशात बेरोजगारीचा भस्मासुर वाढला आहे. मोदी सरकार जाहिरातदारांचे सरकार असल्याचे टीका अर्थ तज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.
या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, विकास सावंत,अभय शिरसाट, चंद्रशेखर जोशी, संतोष मुंज, साईनाथ चव्हाण, सुंदर सावंत,अरविंद मोंडकर,विभावरी सुखी, अमिदी मेस्त्री आधी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी 3 हजार 700 किलोमीटरची पदयात्रा काढली होती याला एक वर्ष पूर्ण झाले. या यात्रेचे संदेश देशभर देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर अर्थतज्ञ भालचंद्र मुनगेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ.भालचंद्र मुंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, विरोधी पक्षाने इंडिया नाव ठेवलं म्हणून देशाचं नाव बदलण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही यामध्ये फरक करत 2014 पासून या देशांमध्ये संसदीय लोकशाहीच्या बुरख्याखाली अध्यक्षीय लोकशाही सुरू केली आहे. अशी टीका केली. मागील नऊ वर्षाच्या काळात मोदी एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. यु पी ए 1 व 2 या सरकारच्या काळात स्पेक्ट्रमचा 70 हजार कोटींचा घोटाळा झाला हे मान्य आहे. यावेळी यु पी ए च्या आठ केंद्रीय मंत्र्यांनी हे राजीनामे दिले. मात्र मोदी सरकारच्या काळात यापेक्षाही घोटाळे झाले आहेत. मात्र एकाही मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
रुपयाची किंमत घटली असून महागाई वाढली आहे. त्यामुळे या सरकारचं महागाईवर नियंत्रण नाही. कांद्याचा निर्यातीवरील कर वाढल्याने देशामधील कांद्याची किंमत वाढली आहे यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागला. महागाईवर या देशाच्या सरकारचं नियंत्रण नाही, तर व्यापाऱ्यांचं या सरकारवर नियंत्रण आहे. रोजगार देण्याच्या बाबतीत या सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र देशातील 41 कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचेही डॉ मुणगेकर म्हणाले.
मोदींनी 370 कलम रद्द करून काश्मीरचे तीन भाग केल्याचाही खळबळजनक आरोप यावेळी डॉ मुंनगेकर यांनी केला, तर मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी मणिपूर मध्ये का जाऊ शकत नाही. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला
तर निवडणुकीला सहा महिने असताना एक देश एक निवडणुकीची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत, मोदी लोकशाही मानत नाहीत जे चाललं आहे हुकूमशाही आणण्यासाठी चालला आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्याच बरोबर भाजपचे प्रचारक असल्याचाही यावेळी मुणगेकर म्हणाले. मोदी देशात आर्थिक सामाजिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण करू पाहत आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांनी तटस्थ भूमिका घेत. मोदी सरकारच्या धोरणांचा समर्थन करू नये असे आव्हानही देशवासीयांना केलं.