नारळ फोडायला नव्हे, वाढवायला येतो; रिकाम्या एमआयडीसी प्लॉटवर लवकरच कारवाई : उद्योगमंत्री उदय सामंत

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 08, 2025 14:06 PM
views 185  views

कुडाळ : "मी नारळ फोडायला येत नाही, मी नारळ वाढवायला येतो आणि काही जणांवरून ओवाळून टाकतो," अशा खास शैलीत बोलून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ एमआयडीसीच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, रिकाम्या पडून असलेल्या भूखंडांवर लवकरच कारवाई केली जाईल, ज्यामुळे नवीन उद्योजकांना संधी मिळेल.

रिकाम्या प्लॉटवर कारवाईचा इशारा : कुडाळ एमआयडीसीमध्ये ७० नवीन उद्योगांची वाढ झाल्याबद्दल सामंत यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, यापुढे उद्योजकांचे प्लॉट थांबवले जाणार नाहीत, असा शब्द देतानाच त्यांनी रिकाम्या भूखंडांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.  "कुडाळ एमआयडीसीमध्ये जे प्लॉट रिकामी असतील, त्या सर्वांना नोटीस काढली जाईल."  "ज्यांना काम करायचे नसेल, ते प्लॉट खाली केले जातील आणि लवकरच ही कारवाई केली जाईल." आडाळी येथे देखील मोठे उद्योग येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

राजकारण नाही, विकास हेच उद्दिष्ट : माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या काही मागण्या आचारसंहितेनंतर पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन सामंत यांनी दिले. यावेळी त्यांनी राजकीय आठवणींना उजाळा दिला. "राणे यांच्याबरोबर भांडण्यासाठी मला पूर्वी मंत्री केले, हे मला उशिरा कळलं." त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे प्रयत्न राजकारण पलीकडे जाऊन विकास करण्यासाठी असतील. माजी मंत्री दीपकभाई यांनी सुरू केलेली 'चांदा ते बांदा' योजना स्टार्टअप्ससाठी महत्त्वाची होती, असे सांगून त्यांनी सिंधुदुर्गच्या विकासातील योगदानाचे कौतुक केले. 

रोजगार निर्मिती आणि आदर्श : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून गेल्या तीन वर्षांत ६७ हजार उद्योजक निर्माण झाले आहेत. उद्योजकांनी आत्मियता दाखवल्यास अनेकांना रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले. हणमंतराव गायकवाड यांच्या कंपनीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, शौचालय साफ करण्याच्या कामापासून सुरुवात करून आज ते सर्वात मोठे उद्योजक झाले आहेत.

सामंत यांनी बॅरिस्टर नाथ पै आणि मधु दंडवते यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, ते आपले आयडॉल आहेत असे म्हटले. तसेच, संजीव कर्पे यांनी बांबूचे व्यावसायिक महत्त्व पटवून दिल्यानेच सरकारला बांबू पॉलिसी आणावी लागली,