कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर वारंवार येणाऱ्या पालकमंत्र्यांना फोंडाघाट येथील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करायला वेळ मिळू नये हे हे सिंधुदुर्ग वासीयांचे दुर्दैवी असल्याचे टीका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये फोंडाघाट व करूळ घाट, येथे दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत होते. याच मार्गावरून गणेशोत्सवा मोठ्या प्रमाणात मुंबई स्थित चाकरमान्यांचे येणे जाणे असते याचं सोयर सुतक पालकमंत्र्यांना नाही असे पिळणकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगितलं होतं कि घाटाची पाहणी करून तात्काळ उपयोजना केली जाईल, परंतु तसे दिसत नाही फोंडा घाट येते रस्ता अरुंद असल्यामुळे मुळातच अनेक अपघात होऊन, अनेक प्रवाशांना वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ लक्ष देऊन. फोंडाघाट रस्त्याची पाहणी करून घाटामध्ये अपघात होणार नाहीत, याची दखल घ्यावी अशी विनंती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे.