दोडामार्ग : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत यावर्षी 15 सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर ह्या पंधरवड्यात कचरा मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. याची सुरुवात तळकट ग्रामपंचायतने पूर्ण प्राथमिक शाळा तळकट नंबर 1 येथून पहिल्याच दिवसापासून केली.यावेळी शाळेतील मुलांना, सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, उपसरपंच रमाकांत गवस, ग्रामसेवक जाधव, तळकट शाळेचे मुख्याध्यापक पवार यांनी अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच शाळा , घर व ग्राम स्वच्छतेचे महत्वही पटवून दिले.
यानंतर शाळेतील मुलांनी स्वच्छतेवर आधारित जनजागृती पटनाट्य सादर केले. आणि उपस्थितांनी व शाळेतील मुलांनी शाळेच्या परिसराची साफसफाई केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पूर्वी सावंत, दिव्या राऊळ, गौरेश गवस, प्रजोत देसाई, जगदाणे गुरुजी आदी उपस्थित होते.