राज्य सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करणार : परशुराम उपरकर

कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक ही तरुणाची फसवणूक | या भरतीत एजंटाच्या माध्यमातून भरती होणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 16, 2023 19:04 PM
views 109  views

कणकवली : सद्याचे महायुती सरकार हे बेरोजगारांच्या मुळावर उठले आहेत.राज्यात आणि जिल्ह्यात बेरोजगारी वाढत असताना भरतीच्या नोटीस काढत दोन ते चार वेळा भरती पुढे ढकलली आहे.कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक ही तरुणाची फसवणूक केली आहे.या भरतीत एजंटाच्या माध्यमातून भरती होणार आहे.सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नो कंपन्या विविध विभागांमध्ये आता राज्य सरकार च्या माध्यमातून भरती करणार आहेत. त्या कंपन्यांना १५ टक्के देण्याचे धोरण निश्चित केले आहे.गेल्या तीन वर्षांपूर्वी नोकऱ्या देण्यासाठी कंपनी नेमली. एजंट बेरोजगाराना गाठून ६० ते ७० हजार घेऊन भरती होइल. पुन्हा पाच वर्षानंतर त्या तरुणांना नोकऱ्या राहणार नाहीत, अशी भीती परशुराम उपरकर यांनी व्यक्त केली.

भरती झालेल्या तरुणांना ५ वर्षानंतर नोकरीची हमी राहणार नाही. या तरुणांच्या जीवाशी खेळण्याचं काम राज्य सरकारने चालवले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला मनसेचा विरोध राहील,असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.