कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह : संजय वेंगुर्लेकर

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 21, 2023 13:51 PM
views 118  views

कुडाळ : कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय स्वागतार्ह आहे, असे भाजप कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी सांगून कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय काँग्रेसच्या काळापासून ते उद्धव ठाकरे यांच्या कालावधीपर्यंत करण्यात आली. असल्याचे श्री वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

भाजप कुडाळ कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय वेंगुर्लेकर बोलत होते यावेळी, जिल्हा चिटणीस विनायक राणे, ओरोस मंडळ तालुका अध्यक्ष दादा साईल, राजू राऊळ, दिपलक्ष्मी पडते, सचिन तेंडुलकर, संदेश नाईक, रुपेश बिडये, विजय वारंग,सुनील बांदेकर, योगेश राऊळ आदी उपस्थित होते.

तर आपलं पाप लपविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते भाजपवर आरोप करत असल्याचे टीका करत असतानाच हा महाविकास आघाडीचा खोटारडेपणा असल्याचा आरोप कुडाळ भाजप मंडळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केला आहे.