
सावंतवाडी : विजेच्या खांबावरून शॉक लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमन जखमी झाला. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी जबाबदारी झटकत कर्मचारी काळजी घेत नाहीत असं उत्तर दिल आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाढती मनुष्य व वित्त हानी पहाता नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जबाबदार लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
शहरात घननिल मिशाळ हा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक लागून तो कोसळला. त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना विचारल असता ते म्हणाले, कर्मचारी काळजी घेत नाहीत. आपण कोर्टकेससाठी बाहेर आहेत. इन्चार्ज तिथे उपस्थित आहेत. कर्मचाऱ्याव उपचार सुरू असून सिटीस्कॅन केलं जाणार आहे. तर सेफ्टीकीट पुरवण्याच काम कंत्राटदाराची आहे. तरीही आम्ही त्यांना ते कीट पुरवतो. त्याचा वापर केला जात नाही. याच प्रशिक्षण देखील कर्मचारी वर्गाला दिल आहे अशी माहिती त्यांनी दिली.
येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली. काम करताना अचानक तो कर्मचारी खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालय हलविले. दरम्यान, याबाबत उपस्थित अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद नव्हता का ?अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी हात वर केले. तर सेफ्टी कीट कार्यालयात असल्याच त्यांनी सांगितले. तर इतर प्रश्नांची उत्तर देण्याच टाळत तिथून निघून जाणं पसंत केलं. दरम्यान, तिथं उपस्थित दुसऱ्या अधिकाऱ्यास विचारलं असता आपणाला काही कल्पना नाही. याच उत्तर कुठे मिळेल याचीही कल्पना नाही असं उत्तर दिलं. प्रश्नांची उत्तरे नसल्यानं अधिकारी वर्गाने हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जाण पसंत केलं.
दरम्यान, ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी असणारा कंत्राटी कर्मचारी म्हणाला, मी खाली उभा होतो. तेव्हा तो पोलवरून शॉक लागून खाली कोसळला. त्याच्या सेफ्टी कीटबद्दल मला कल्पना नाही. मी नुकताच इथे कार्यरत झालो आहे. दहा दिवस मला झालेत. यावेळी त्याला सेफ्टीकीटबद्दल विचारल असता ? मला अद्याप कीट दिलेलं नाही. तर अधिकाऱ्यांनी शॉक लागलेल्या कर्मचाऱ्यांच कीट कार्यालयात असं सांगितलं ते कुठे आहे ? असं विचारल असता तो म्हणाला, आपल्याला कल्पना नाही. मी नव्यानच रूजू झालो आहे. कंत्राटी कर्मचारी पोलवर चढुन काम करताना महावितरणचा पर्मनंट कर्मचारी कुठे होता ? हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला आहे. कुणाच्या मार्गदर्शनाने हे काम सुरू होतं ? विद्युत प्रवाह सुरू कसा राहिला ? अधिकारी, कर्मचारी अन् कंत्राटदार यात समन्वय नाही का ? हे प्रश्नही उत्तराच्या शोधात आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना केल्यात. महावितरणनं कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी अस ते म्हणालेत. फाटके ग्लोझ त्यांना वापरण्यात देऊ नयेत. पावसाळ्यात चांगलं कीट पुरविण्यात याव. कर्मचारी वर्गाने स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन काम करावं असं मत मसुरकर यांनी व्यक्त केले.
एकंदरीतच, महावितरणच्या बेजबाबदारापणामुळे आतापर्यंत अनेकांचे मनुष्यबळी गेलेत. आता तर कर्मचाऱ्यांचेही जीव धोक्यात आलेत. अधिकारी वर्ग कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. याआधी आरोस, मालवणमध्ये कर्मचाऱ्यांचे पोलवर शॉकबसून जीव गेलेत. त्यामुळे महावितरणमुळे होणाऱ्या जीवीत व वित्तहानीची जबाबदारी घेणार कोण ? की मनुष्याचा जीवही कंत्राटी समजला जात आहे ? हे प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार ? असा सवाल नागरिक आता करत आहेत.