
सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीतील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या वेर्ले या गावात अटल प्रतिष्ठान व आजी-माजी सैनिक उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचा वेर्ले, शिरशिंगे,ओवळीये, कलंबिस्त या गावातील सुमारे तीनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. अटल प्रतिष्ठानचे विश्वस्त व माजी सैनिक बाळकृष्ण लिंगवत यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सैनिक भवन वेर्ले येथे या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला. यासाठी केसरी फार्माचे संचालक व उद्योजक राजेंद्र उर्फ राजू केसरकर यांनी लागणारी सर्व औषधे प्रायोजित केली होती. या शिबीरात फिजीशियन डॉक्टर अभिजीत चितारी, स्त्री रोग तज्ञ डॉ.राजेश नवांगुळ, नेत्ररोग तज्ञ डॉ.नेहा सावंत, मुत्ररोग तज्ञ डॉ. सागर कोल्हे,बालरोगतज्ञ डॉ.संदिप सावंत, अस्थिरोग तज्ञ डॉ.निखील अवधूत, एम.एस सर्जन डॉक्टर अनिकेत वजराटकर, दंतरोग तज्ञ डॉ. विनय सुर्यवंशी, होमिओपॅथिक डॉ.संजीव लिंगवत यांनी रुग्णांची तपासणी केली. दरम्यन, ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे अशानां आयुष्यमान भारत योजनेंतर्गत उपचार देण्यात येणार आहेत. शिबीरात आयुष्यमान भारत नोंदणीचीही व्यवस्था केल्याने अनेकांनी हा लाभ घेण्यासाठी नोंद केली. शिबीराचे उद्घाटन कलंबिस्त पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांनी केले. आपल्या प्रास्ताविक संबोधनात अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.नकुल पार्सेकर यांनी भविष्यात अटल प्रतिष्ठानच्यावतीने जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अशी आरोग्य शिबीर घेऊन ग्रामीण भागातील जनतेमध्ये आरोग्य विषयक सजगता निर्माण करणार असल्याचे सांगितले. डॉक्टर राजेश नवांगुळ यांनी आयुष्यमान भारत योजनेची सविस्तर माहिती दिली. बालरोगतज्ज्ञ डॉक्टर संदिप सावंत यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी अटल प्रतिष्ठानच्यावतीने माजी सैनिक बाळकृष्ण लिंगवत यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच आताच एम.बी.बी. एस. पदवी प्राप्त केलेले यश राजेश नवांगुळ याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक हनुमंत राणे, महादेव लिंगवत, महादेव राणे,संतोष राऊळ,अटलच्या समन्वयक ज्योती
राऊळ,नाना शेंडगे,सौ.मनिषा नवांगुळ ,वेर्लेच्या पोलीस पाटील सौ.प्रियांका सावंत,चितारी हाॅस्पिटल व यशराज मॅटर्निटी हाॅस्पिटलचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
आभार प्रदर्शन अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह रघुनाथ तानावडे यांनी केले तर सुत्रसंचालन अटलच्या खजिनदार अर्पिता वाटवे यानी केले.










