LIVE UPDATES

शिरगाव हायस्कूलच्या नूतनीकरणासाठी १.५० लाखांची देणगी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 04, 2025 22:30 PM
views 88  views

देवगड : तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरण व सुशोभीकरण उपक्रमाला कै. बलवंत शंकर साटम यांच्या स्मृतीप्रित्यर्थे  त्यांचे सुपुत्र शंकर बलवंत साटम व सौ. साटम आणि  प्रणव साटम ( रा ठाणे) कुटुंबीयांनी रु. १,५०,०००/- इतकी अमूल्य देणगी संस्थेला अर्पण केली आहे.

शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरण व सुशोभीकरण उपक्रमाला माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व हितचिंतकांकडून उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे.याच उपक्रमाअंतर्गत, कै. बलवंत शंकर साटम यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करत, त्यांचे सुपुत्र श्री.शंकर बलवंत साटम व सौ. साटम आणि  प्रणव साटम ( रा ठाणे) कुटुंबीयांनी रु. १,५०,०००/- इतकी अमूल्य देणगी संस्थेला अर्पण करण्यात आली

या कार्यामागे कै. बलवंत साटम यांचे बंधू विनायक विष्णु साटम (सदस्य, कुवळे हायस्कूल शाळा समिती) यांचा मोलाचा सहभाग राहिला.संस्थेच्या या पवित्र योजनेमुळे आजपर्यंत ८ वर्गांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण साठी निधी प्राप्त झाला असून, या भावनिक लाटेत अनेक माजी विद्यार्थी पुढे येत आहेत.

या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेत यानिमित्त

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विनायक साटम यांना पुष्पगुच्छ व आभारपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस श्री. रघुनाथ चव्हाण, संस्था उपाध्यक्ष श्री. गणपत तावडे, श्री. संभाजी साटम, मुंबई कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, मिलिंद साटम, शाळेचे अधीक्षक श्री. संदीप साटम, कुवळे हायस्कूलचे चेअरमन श्री. विजय तावडे, कुवळे हायस्कूल शाळा समिती सदस्य प्रकाश धोपटे, विनायक साटम , वसंत साटम आणि शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. एस. एन. अत्तार सर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना संस्था उपाध्यक्ष  गणपत तावडे आणि संभाजी साटम यांनी कै.बलवंत साटम यांचे संस्थेसाठी दिलेले ३५ वर्षांचे समर्पित योगदान नव्या पिढीसमोर मांडले.त्यांनी  एक संस्थासेवक म्हणून जो पायाभूत कामाचा वारसा निर्माण केला,त्याचा गौरव करत उपस्थितांना जुन्या आठवणी ताज्या केल्या 

कै.बलवंत शंकर साटम यांच्या स्मृतीला ही देणगी एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे.शाळेच्या भिंती आता केवळ इमारती नाहीत, त्या भावनांची, आठवणींची, आणि कृतज्ञतेचीसाक्षआहेत.दाखवलेली ही आपुलकी नव्या पिढीला एक जीवंत आदर्श देऊन जाणारी  आहे.