वैभववाडी : सांगेली येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातुन झालेल्या विषबाधामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच पालक वर्ग भयभीत झाला आहे.पालकांनी सांगेलीकडे धाव घेतली आहे.
नवोदय विद्यालयात शिकत असणा-या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.ही बातमी समजताच पालकवर्ग भयभीत झाले आहे.ब-याच पालकांनी आपल्या पाल्यांना भेटण्यासाठी थेट सांगेली गाठली आहे.या घटनेमुळे पालकवर्गही चिंताग्रस्त झाला आहे.तेथील व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.