
सावंतवाडी : जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंजिवडे गवळीवाडी भैरीची पांदन ते धुरीवाडी पाटगाव गारगोटी कोल्हापूर जिल्हा घाट मार्ग असा एकुण सुमारे 5.110 कि.मी. लांबीचा रस्ता झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा ते कोल्हापूर 45 कि.मी.ने अंतर कमी होणार असल्याने सदर रस्त्याचे बांधकाम स्टेट बजेट मध्ये समाविष्ट करुन सदर रस्त्यासाठी लागणारी खाजगी व वन जमीनीचे भूसंपादन करणे बाबतचे आदेश देण्याबाबत जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी लक्ष वेधल आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील आंजिवडे गवळीवाडी भैरीची पांदन ते धुरीवाडी पाटगाव गारगोटी कोल्हापूर या मार्गाचे बांधकाम व रस्ता स्टेट बजेट मध्ये समाविष्ट केल्यानंतर हा घाट पूर्ण झाल्यास सुमारे 45 कि.मी. अंतर गोवा सावंतवाडी मार्गे कुडाळ तालुक्यातील आंजिवडे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी मार्गे कोल्हापूर व त्यामधील बांधकाम पुर्ण झाल्यास जनतेला कमी होईल. तसेच हा घाट मार्ग 5.110 कि.मी. असल्याने तो पूर्ण झाल्यास संपूर्ण कोल्हापूर व सिंधुदुर्गातील जनतेला सोयीस्कर होईल. व तसेच इंधन व वेळेची बचत होईल, सदरील 5.110 कि.मी. चा ते पाटगाव कोल्हापूर घाट मार्गाचा सर्वे भूसंपादन लागणारी खाजगी जमीन, वनजमीन, त्याचप्रमाणे लागणारे मोऱ्या, छोटे पूल पाईप वगैरे रस्त्यांचे शासनामार्फत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सर्वे झाला असून यासाठी अंदाजे २५० कोटी रुपये या रस्त्याला खर्च लागणार असून याचा सर्वे शासनामार्फत झाला आहे तो खालीलप्रमाणे रस्ते नविन बांधकाम:-5.110 कि.मी, लहान व मोठे पूल:-3 नग, पाईप व मोऱ्या:- 28नग, स्लॅब व कल्हवर्ट:- 28 नग, संरक्षक भिंत:- 1710 मि, भूसंपादन, खासगी जमीन:- 3.00 कि.मी, वनजमीन:- 12.30 कि.मी* सदर रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्त्याचे नविन बांधकाम करणे. लहान पूल/ मोठे पूल/ संरक्षक भिंत/ मोऱ्या बांधणे ई. बाबी करणेसाठी अंदाजित २५० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. सद्यस्थीतीत सावंतवाडी आंबोली घाट मार्ग ते कोल्हापूर बेळगाव हा जाण्याचा मार्ग असल्याने या आंबोली घाटामध्ये बरेच वेळा पावसाळ्यात दरड कोसळून आंबोली घाट बरेचदा कित्येक दिवस बंद असतो. त्यामुळे अनेकदा गंभीर रुग्ण, त्याचप्रमाणे प्रवासी वाहतूक कोल्हापूर व बेळगाव होलसेल बाजारपेठ असल्याने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे प्रस्तावित रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यास ४५ कि.मी.ने अंतर कमी होऊन या घाट मार्गाने प्रवास करुन वेळेची, इंधनाची व व्यापारदृष्टीने दोन्ही जिल्हृयातील जनतेला होणार आहे. तसेच हा कुडाळ तालुक्यातील आंजिवडे घाट मार्ग पूर्ण झाल्यास अनेक पर्यटकांना आंजिवडे नजिक असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला मनोहर संतोषी गड व तसेच रांगणा तुळसुली गड
त्याचप्रमाणे कुडाळ तालुक्यातील माणगाव मध्ये श्री गुरुदेव दत्त महाराजांचे अवतार घेतलेले जन्मस्थान टेंबे स्वामी यांचे जन्मस्थान या भागांमध्ये असून भाविक पर्यटकांना या तीनही धार्मीक पर्यटनाचा लाभ घेता येईल. त्यामुळे या भागातील वर्दळ वाढून सर्व व्यापारी कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील व माणगाव खोऱ्यातील पर्यटकांमुळे बाजारपेठ मिळाल्याने याचा फायदा व्यापारी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, पर्यटकांना दाखवणारे गाईड, छोटे मोठे हॉटेल्स अशा विविध प्रकारच्या जनतेला रोजगार प्राप्त होईल तसेच सिंधुदुर्ग जिल्हृयातील आजारी व अपघात ग्रस्ताना सदर जवळच्या मार्गाने कोल्हापूर- पुणे येथे कमी वेळेत जाउुन उपचार घेता येईल. यामुळे या माझ्या विनंतीच्या अर्जाची दखल घेऊन आपण वरील प्रमाणे घाट मार्ग रस्ता(भूसंपादन सहित) पूर्ण करण्याकरिता स्टेट बजेट मध्ये समाविष्ट करावा अशी विनंती जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.