
कणकवली : कलमठ येथील पाण्याच्या टाकीचा पंप नादुरुस्त झाला आहे. परिणामी तेथून पाणीपुरवठा होणाऱ्या कणकवली शहरातील बिजलीनगर, किनईरोड, गांगोवाडी या परिसरात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.