ठाकरेंची खळा बैठका केवळ दाखविण्यासाठी : नितेश राणे

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 22, 2023 14:40 PM
views 204  views

कणकवली : खळा बैठका आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा व गोवा मध्ये असलेले फिल्म फेस्टिवल याचे काय साम्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हावर खरंच आदित्य ठाकरे यांचे प्रेम आहे की गोव्याची फिल्म फेस्टिवल मध्ये हजेरी लावून. बॉलीवूडच्या लोकांसोबत पार्टी करायची आहे."सिंधुदुर्ग तो बहाना है, पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के ऍक्टरो के साथ नाचना है.! अशी घणाघाती टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.ज्यांची संघटना खिळखिळी झाली त्यांना खळा बैठक शिवाय दुसरा पर्याय नाही.असेही ते म्हणाले.

कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विविध विषयांवर भाष्य करतानाच आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर सडकून टीका केली.

आज सकाळी 10 जनपथ चा नवीन कामगार ज्याचा पगार राहुल गांधीकडुन येतोय. तो आज नॅशनल हेराल्ड ची बाजू मांडताना दिसला.जी बाजू नॅशनल हेराल्ड काँग्रेस चे काम करतो तेच काम आता सामना करत आहे. गांधी कुटुंबियांवर झालेल्या कारवाई वर समर्थन करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन करण्यासारखे आहे. संजय राऊत ते करत आहे. हेराल्ड ची भूमिका जी आहे तीच प्रबोधन ट्रस्ट ची सुद्धा आहे.आता दोघांचा ढाचा एकच झाला आहे.तिथे राहुल,सोनिया,इथे रश्मी ,आदित्य आहेत.म्हणजे भ्रष्टाचार करण्यात सुद्धा साम्य आहे.

     राहुल गांधी यांनी पणवती ह्या शब्दावर मोठं वक्तव्य करण्याचे धाडस केले आहे. १९ नोव्हेंबर स्व.इंदिरा गांधी जयंती होती मग भारत त्यादिवशी  जिंकलाच पाहिजे होता. मग खरी पणवती कोण ? गेल्या 70 वर्षात देशात गांधी कुटुंबाची जी पनवती लागलेली होती ती नरेंद्र मोदी यांनी सत्ता बदल करून दूर केलेले आहे.  


राष्ट्रपिता म्हणजे नरेंद्र मोदी

फादर ऑफ द नेशन कसा असतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिलेले आहे. क्रिकेटची मॅच संपल्यानंतर उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूला भेटून त्याचे मनोधैर्य वाढवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एक नेता कसा असावा, एक पालक कसा असावा, राष्ट्रपिता कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजेच नरेंद्र भाई मोदी आहेत. याउलट राहुल गांधी हे अर्धे इटालियन आहेत जे भारताचे संपूर्ण नागरिक नाहीत, अशा राहुल गांधींना देश प्रेम कधीच कळणार नाही. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी टीका केली. भाजप मध्ये आल्यावर कोणाची प्रॉपर्टी मोकळी झाली ते सांगावं.ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार.ज्या डॉक्टर महिलेच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या,त्यांना त्रास दिला. छळले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी गृह मंत्रालयाला अधिवेशनात करणार आहे.गृहमंत्री आणि त्यांचे खाते कसे आहे ते संजय राऊत यांना कळेल असेही ते म्हणाले.बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ होता.तेव्हा भाजपची त्या शिवसेने सोबत युती होती.आता उद्धव ठाकरे मुल्ला झाले आहेत.अशी ही टीका आमदार नितेश राणे यांनी केली.