मालवण : राज्यातील राजकीय घडामोडींबाबत राग व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने राबविण्यात आलेल्या "एक सही संतापाची" या मोहिमेस मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'बेडूक उड्या बंद करा' असं म्हणत नागरिकांनी मनसेच्या फलकावर सही केली.
राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडींबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे का ? या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का ? चीड येत नाही का ? माझ्या मताला काही किंमत नाही का ? असे विविध प्रश्न विचारात मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात "एक सही संतापाची" ही मोहीम राबविली. सोमवारी मालवण भरड नाका येथे ही मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रतीक कुबल व संदीप लाड यांच्या नेतृत्वात फलक उभारून मोहीम राबविण्यात आली. यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, पास्कोल रॉड्रिग्ज, रामनाथ परा डकर, गणेश वाईरकर, विशालओटवणेकर, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुबल, तालुकाध्यक्ष संदीप लाड, मिताली बांबर्डेकर, सुरज मांजरेकर, कुणाल चोडणेकर, हर्षद परब, तुषार जुवेकर, तेजस खराडे, नितीन राठोड, साईश किर, राज शेलटकर, तथागत मालवणकर, कुणाल माळवदे, प्रसाद बापर्डेकर, लौकिक अंधारी, चिन्मय कुवळेकर, वैभव आजगावकर, दर्शन सावजी, योगेश हडकर, राहुल मिसाळ आदी उपस्थित होते.
मनसेच्या या मोहिमेत मोठ्या फलकावर महाविद्यालयीन तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, व्यापारी यांनी मनसेच्या या मोहिमेत सहभाग घेत आपला संताप व्यक्त केला.