वैभववाडी : तालुक्यात काल पासून पावसाने हजेरी लावल्यानंतर पहिल्याच पावसात विज वितरण व्यवस्था विस्कळित झाली .आज दिवसभर शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू होते. मात्र, तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या दुरध्वनीवर संपर्क होत नसल्याने अनेकांची गैरसोय झाली.
तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने दमदार सुरूवात केली आहे. पहील्याच पावसात वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.शुक्रवारी रात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित होणे सुरू होतं. त्याननंंतर शनिवारी दुपारी शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा विस्कळित झाला होता. या संदर्भात विज वितरण कंपनीच्या तालुका कार्यालयाला अनेकांनी संपर्क केला मात्र त्यावर प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. या कार्यालयाचा दूरध्वनी बंद असल्याची माहिती देखील समोर येत आहे.आपत्ती कालावधीत संपर्क कसा साधावा असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.