सावंतवाडी : शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ आज तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. १७ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
सावंतवाडी तालुका स्तरावरील आयुष्यमान भव चा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आज करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी वैद्यकीय उपचारांसह आरोग्याच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. निरोगी जीवनासह आरोग्य सेवेची शपथही यावेळी घेण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार श्रीधर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, रूग्ण कल्याण समिती सदस्य अशोक दळवी, अँड. नकुल पार्सेकर, डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. चौगुले, तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, डॉ. मुरली चव्हाण, प्रथमेश प्रभू आदी उपस्थित होते.