वैभववाडी : उबाठा शिवसेनेच्या वतीने मुंबईत राहणाऱ्या कोकणणवासींचा मेळावा उद्या (ता२६ नोव्हेंबर)भांडूप येथील दिना पाटील इस्टेटच्या मैदानावर सायंकाळी ५वा आयोजित केला आहे.या मेळाव्यात सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत कोकणवासीयांशी संवाद साधणार आहेत.
कोकणातून मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या कोकणवासीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उबाठा शिवसेनेच्यावतीने मेळाव्याचे आयोजन केले आहे.सिंधूदूर्ग शिवसेनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांच्या समन्वयातून या मेळावा संपन्न होत आहे.या मेळाव्याच्या निमित्ताने पोवाडा सादरीकरण केले जाणार आहे.
त्यानंतर खास. विनायक राऊत यांनी कोकणात मागील नऊ वर्षांत केलेल्या कामांची चित्रफिती प्रदर्शित केली जाणार आहे. या मेळाव्याला मुंबई लोकसभा संघटक संजय पाटील ,आमदार वैभव नाईक, आम.राजन साळवी, आम.सुनील राऊत, आम. रमेश कोरगावकर, शिवसेना उपनेते अरूण दुधवडकर , उपनेत्या जान्हवी सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील कोकणवासीयांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संदीप सरवणकर यांनी केले आहे.