काजूबीला २०० रुपये हमी भाव द्या : जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख

१६ फेब्रुवारीला होणाऱ्या आंदोलनास काँग्रेसचा पाठिंबा
Edited by: दिपेश परब
Published on: February 15, 2024 09:09 AM
views 43  views

सावंतवाडी : काजूबीला किमान २०० रुपये हमीभाव मिळण्यासाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघटनांनी सनदशीर मार्गाने शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी प्रत्येक तालुका स्तरावर पुकारलेल्या धरणे आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे. काजूबीचा भाव घसरल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. परदेशातील हलक्या प्रतिच्या काजूची आयात होत असल्यामुळे स्थानिक उच्च प्रतिच्या काजूबीला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे काजू बागायतदारांचे फार नुकसान होत आहे त्यामुळे स्थानिक काजूबीला किमान 200 रुपये हमी भाव द्यावा अशी काँग्रेस पक्षाची सुद्धा मागणी आहे. म्हणून 16 रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनास काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा या धरणे आंदोलनात सक्रिय सहभाग असेल असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.