
दोडामार्ग : पावसाळा सुरु झाला शेतकरी राजा शेतीच्या कामांना सुरवात करण्यास तयारी करीत आहे. मात्र शासनाच्या योजनांपासुन मिळणारी शेती अवजारेच जर शेतकऱ्याला मिळत नसतील तर सरकारच्या फसव्या योजनांचा काय फायदा ? त्यामुळे योजना जर असतील तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास अडचणी येत असतील तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून शेतकऱ्याना अवजारे, बियाणे द्या अशी मागणी युवा सेनेच्यावतीने कृषी विभागकडे केली.
दोडामार्ग कृषी विभागाला आज उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत सूचना केल्यात. पावसाळा सुरु झाला आहे. शेतीच्या कामांना सुरुवात होणार आणि सरकारकडून शेतकऱ्यांना अवजारे, बियाणे यासारखे वस्तू अनुदानावर दिल्या जातात मात्र गेल्या काही महिन्या पासून शासनाच्या योजनांपासून शेतकरी वर्ग अवजारे, बी बियाणे खरेदी करत असतो त्यासाठी या योजना घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. मात्र बऱ्याच महिन्या पासून ऑनलाईन प्रणाली बंद, तर कागद पत्रे अपुरी या सर्व गोष्टीमुळे इथला शेतकरी वर्ग या ऑनलाईन पद्धतीमुळे हतबल झाला आहे.
त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज न घेता ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज घ्या व शेतकयांना या योजनाचा फायदा द्या असे आवाहन युवा सेनेच्या वतीने कृषि विभाग यांना केले आहे. यावेळी तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, संदेश राणे, भिवा गवस, प्रदीप सावंत, काका नाईक, आदी उपस्थित होते.