LIVE UPDATES

कोकणात 'वणवा' म्हणजे, फळ लागवड योजनेला लागलेला शाप : सुरेश उपरे

Edited by:
Published on: June 13, 2025 12:48 PM
views 486  views

चिपळूण : कोकणात लागणारा वणवा हा फळ लागवड योजनेला लागलेला शाप ठरत आहे. ग्रामस्थांनी त्यासाठी जागरुक राहिले तर जंगल सुरक्षित राहतील, असे मत नायशी येथे कृषी दिनानिमित्त आयोजित जागतिक पर्यावरण दिन व कृषी मार्गदर्शन मेळावाप्रसंगी मार्गदर्शन करताना सावर्डेचे वनपाल सुरेश उपरे यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच संदीप घाग, सदस्या हृतिका जाधव, किशोर घाग, नायशी पंचक्रोशी संस्थेचे संचालक रमेश घाग, रुपेश गमरे, संतोष कदम, संतोष चव्हाण, महेश धामणस्कर, काशिनाथ पेंडामकर, अरविंद बाग, अशोक घाग, संतोष चव्हाण, जलजीवन योजनेचे सरकारी ठेकेदार ऋत्विज घाग, बाजीराव घाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा प्रतिनिधी हर्षल धाग, सुयश चव्हाण, अंगणवाडी सेविका, जि. प. शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी वनपाल सुरेश उपरे यांनी, वणवा टाळण्यासाठी कठोर पावले ग्रामस्थांनी उचलून वनविभाग व पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास वणवा लागण्याच्या प्रकारास आळा बसेल, असे सांगितले. यावेळी प्रथमच नायशी ग्रामपंचायतीवतीने पाचवेवाडी वाघेश्वरी केदारनाथ सहाण, जि. प. शाळा, वाघेश्वरी केदारनाथ ग्राम मंदिर नायशी,  या ठिकाणी सरपंच संदीप घाग, वनविभागाचे वनपाल सुरेश उपरे, समाजिक वनीकरण विभागाचे अर्जुन जाधव, चिपळूण तालुका कृषी सहाय्यक आकाश चव्हाण, सुभाष घाग, श्रीघर घाग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सानवी घाग, ग्रामसेवक श्री. सोनवणे, माजी सरपंच किशोर घाग यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

चिपळूण तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आकाश चव्हाण यांनी कृषी विभागाच्या फळ लागवड, शेती, शेततळे, बियाणे आदी विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक वनीकरण विभागाचे अर्जुन जाधव यांनी खैर लागवड व शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या रोपे, पर्यावरण संतुलन याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक संजिवनी जाधव, सामाजिक वनीकरणच्या समृद्धी आरखटे, अरुण जाधव, कृषी सहाय्यक आकाश चव्हाण, संतोष कदम, रवींद्र गुरव, , ग्रामविकास अधिकारी वाय. बी. सोनवणे यांचा ग्रामपंचयात वतीने तर नायशी बौद्धजन सेवा संघाच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच संदीप घाग सत्कार करण्यात आला. कृषी मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत लिपिक जाधव, ग्रामविकास अधिकारी वाय. बी. सोनवणे, ग्रामस्थ रवींद्र जाधव, हर्षल घाग, सुयश चव्हाण व ग्रामस्थांनी सहकार्य केले.