कणकवली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी कळसुली पुनर्वसन येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण बळीराम दळवी यांची निवड करण्यात आली. सरपंच सचिन पारधिये यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समिती पुर्नरचनेबाबत कार्यवाही होवून, उपस्थितांकडून प्रविण बळीराम दळवी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे मावळते अध्यक्ष दिलिप भगवान सावंत यांनी मागील वर्षभर केलेल्या उत्कृष्ठ कामकाजाबाबत त्यांचे अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तरी सर्वांना विश्वासात घेवून कळसुली गांवामध्ये तंटामुक्त गाव समितीचे काम करणार असल्याचा विश्वास, नूतन अध्यक्ष प्रविण बळीराम दळवी यांनी व्यक्त केला. यावेळी उपसरपंच, गणेश मठकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दळवी, मानसी दळवी, भावना सावंत तावडे, नंदकिशोर परब यांच्यासहीत बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते.