राणेंच्या 'त्या' वक्तव्याचा जिल्हा कॉंग्रेसने केला निषेध

Edited by:
Published on: January 15, 2024 06:56 AM
views 205  views

सावंतवाडी : राममंदिराबद्दल शंकराचार्य यांच्या भुमिकेबद्दल विधान करताना शंकराचार्यांच हिंदु धर्मासाठी योगदान काय ? रामा एवढं नाही असं विधान त्यांनी केल. शंकराचार्य यांच्या बद्दल अस वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जिल्हा काँग्रेसकडून जाहीर निषेध करत असल्याच मत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी व्यक्त केल. दरम्यान शंकराचार्यांबाबत अस वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्यावर भारतीय जनता पार्टी केव्हा कारवाई करणार ? असा सवाल देखील श्री इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कॉंग्रेस नेते विकास सावंत, समिर वंजारी, अँड. राघवेंद्र नार्वेकर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, मंदीर पुर्ण होण्याआधी प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे शंकराचार्य यांनी स्पष्ट केले आहे. परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यांवर तोंड सुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक पाऊल पुढे टाकत शंकराचार्याचे योगदान काय असा प्रश्न विचारून शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने नारायण राणे यांचा वक्तव्याचा निषेध करत आहे. शंकराचार्याचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणे यांचे तरी राम मंदिरसाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतूनळ काँग्रेस व नंतर भाजपात गेले आहेत. भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच मोदीसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी आयुष्यात कुठेही मर्यादेच उल्लंघन केले नाही. ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान केला नाही. श्रीराम यांना सत्ता चालून आली असतानाही त्यांनी त्या सत्तेचा त्याग करुन 14 वर्ष वनवासात घालवली. अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरासाठी शंकराचार्यावर तोंडसुख घेणारे नारायण राणे यांसारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदू धर्माला कलंक आहेत.

शंकराचार्याचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा कधी व काय कारवाई करणार? अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, त्याला कोणाचाच विरोध नाही. धर्म हा आस्थेचा विषय आहे राजकारणाचा नाही. परंतु, भारतीय जनता पक्षाने राजकारणात धर्म आणून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई चालवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठा करुन मतांचा जोगवा मागण्यासाठी हे सर्व चालले आहे. मागील 10 वर्षाताली कामांवर भाजपा मते मागू शकत नाही. कारण त्यांनी लोकांना सांगावे असे काहीच केलेले नाही त्यामुळे रामाच्या नावावर मतं मागण्याचा हा खटाटोप आहे. राम मंदिरासाठी स्वतंत्र्य न्यास आहे. परंतु भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा इव्हेंट बनवलेला आहे असं मत त्यांनी व्यक्त केल.