खात्यावर पंधरा लाख आले का..?

आ. वैभव नाईक यांचा सवाल | 'होऊ द्या चर्चा'
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 04, 2023 15:31 PM
views 532  views

कुडाळ : खात्यावर पंधरा लाख मिळाले का असा प्रश्न विचारत आमदार वैभव नाईक यांनी केंद्रातील भाजप व राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारला धारेवर धरलं. कुडाळ मालवण मतदार संघात आज आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली होऊ द्या चर्चा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार वैभव नाईक, गौरीशंकर खोत, सतिश सावंत, गुरुनाथ खोत, जिल्हा प्रमुख संजय पडते, प्रदीप बोरकर, रुपेश पावसकर, अमरसेन सावंत, जान्हवी सावंत , संतोष शिरसाट, मंदार शिरसाट, राजन नाईक, उदय मांजरेकर, श्रेया गवंडे, श्रृती वर्दम, ज्योती जळवी, सई काळप, आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक यांनी  उपस्थितांना संबोधित करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली, तर सर्वसामान्यांना प्रश्न विचारात शासनाने घोषणा केलेल्या योजना आपल्याला मिळाल्या का असा सवाल ही उपस्थित केला, या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुडाळ तालुक्यातील सरपंच उपसरपंच व शिवसैनिक उपस्थित होते.