सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे नेते अतुल रावरणे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घेतलेल्या भेटीवर टीका केलीय. दीपक केसरकरांचं नेहमी स्वार्थी राजकारण राहिल्याच ते म्हणालेत.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे नारायण राणे यांचे बारा वर्षानी भेट घ्यायला गेले याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतला आश्चर्य वाटणार नाही. कारण दीपक केसरकर यांनी नेहमी स्वार्थी राजकारण केलं. जे दीपक केसरकर नारायण राणेंना दहशतवादी आहेत म्हणून सांगत होते. त्या राणेंच्या दारी जात त्यांचे पाय धरण्याचे काम दीपक केसरकर यांनी केलं. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी दीपक केसरकर वाटेल ते करायला तयार आहेत. त्यामुळे त्यांचा हा स्वार्थी स्वभाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने ओळखला आहे. दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करू शकत नाहीत. पालकमंत्री असताना अनेक गोष्टी त्यांनी अपूर्ण ठेवल्या. त्यामुळे अशा स्वार्थी दीपक केसरकारांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा अतुल राव राणे यांनी दीपक केसरकर यांना दिला आहे.अतुल रावराणे यांनी दीपक केसरकर आणि नारायण राणे भेटीवर जोरदार टीका केली आहे.