
चिपळूूण : ओमान मधील जहाज दुर्घटनेत संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील युवक समरान इब्राहिम सय्यद यांचा मृत्यू झाल्याची माहिती ओमान कंपनी ने गुरुवारी कुटुंबीयांना कळवली आहे. यामुळे कसबा गावात शोककळा पसरली. ओमान किनाऱ्यावरील शिप प्रेस्टिज फाल्कन दुर्घटनेत - क्रू समरान इब्राहिम सय्यद (कसबा- पारकर वाडा) हा आज गुरुवारी त्यांचे रुग्णालयात (ओमानमध्ये) निधन झाल्याचे कळवण्यात आले. अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये सर्वोच्च स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना धैर्य देवो असा मेसेज कंपनी ने कळवला आहे. दोन महिन्या पूर्वीच समरान इब्राहिम सय्यद हा ओमान मध्ये बोटीवर गेला होता. ओमान समुद्रात बुडालेल्या १३ भारतीयामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव समरान या तरुणाचा समावेश होता.
ओमान च्या समुद्र किनाऱ्यावर तेलाचे जहाज उलटले, १३ भारतीय बेपत्ता झाले होते. ओमानच्या किनारपट्टीवर एक मोठी दुर्घटना घडली, जिथे तेलाचे जहाज उलटल्याने १३ भारतीयांसह १६ लोकांचा संपूर्ण क्रू बेपत्ता झाला होते. भारतीयांसह इतर लोकांचा अद्याप शोध लागलेला नव्हता. यात इतर तीन क्रू मेंबर्स श्रीलंकेचे होते. समरानच्या कुटुंबियांना प्रथम जहाज बुडाल्याने कंपनीकडून कळवण्यात आले होते. यानंतर गुरुवारी कंपनीने समरानचे निधन झाल्याची माहिती कळवली. यामुळे समरानच्या कुटुंबासह कसबा गावावर शोककळा पसरली आहे.