दाभोली मोबारातील पाण्याचा मार्ग मोकळा | दीपक केसरकर यांनी घेतली तात्काळ दखल

Edited by: दिपेश परब
Published on: June 29, 2023 20:05 PM
views 195  views

वेंगुर्ला :  तालुक्यातील दाभोली येथील समुद्र किनाऱ्यावर वाळूचा गाळ साचल्याने येथील मोबारातील खाडीच्या पाण्याला समुद्रात जाण्यासाठी वाट मिळत नव्हती त्यामुळे हे पाणी शेजारील रस्त्यावर आले होते तसेच याठिकाणी असणाऱ्या माडये कुटुंबियांच्या घरात पाणी जाण्याचा धोकाही निर्माण झाला होता. दरम्यान याची माहिती मिळताच याबाबत शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी याची तात्काळ दखल घेत पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. 

दाभोली येथे मोबारातील खाडीचे पाणी समुद्रात जाण्यासाठी वाळूचा गाळ साचल्याने वाट मिळत नव्हती. गेल्यावर्षी असेच पाणी साचल्याने येथील रहिवासी संजय माडये व बाळा माडये यांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. यावेळी सुद्धा या मोबारातील पाण्याला समुद्रात जाण्यासाठी गाळ साचल्याने वाट नसल्याने पाणी शेजारील रस्त्यावर आले होते व माडये कुटुंबियांच्या घरात पुन्हा पाणी जाण्याचा धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच उपसरपंच फिन्सुअनिता फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ, सामाजिक कार्यकर्ते नरेश बोवलेकर, समाधान बांधवलकर यांनी त्याठिकाणी पाहणीकरून तात्काळ याबाबत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या पाठपुराव्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे समुद्राचा गाळ काढून वाट करून देण्याची मागणी केली होती. दरम्यान याची दीपक केसरकर यांनी तात्काळ दखल घेत जेसीबीच्या साहाय्याने हा या पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे पुढील धोका टळला. याबाबत दाभोली ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकारी व दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.