वैभववाडी : भुईबावडा पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून वीजेचा पुरवठा विस्कळित झाला आहे.दिर्घ काळासाठी विजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे या भागातील नागरिक हैराण झाले आहेत.
भुईबावडा गावांसह आजूबाजूच्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.जुलै महीन्यापासून हा प्रकार सुरू आहे.याचा परिणाम भुईबावडा येथील बाजारपेठेवर होत आहे.वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत.तसेच या पंचक्रोशीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या केरोसीन पुरवठाही बंद असल्याने रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांची गैरसोय होत आहे.शाळकरी विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक,आजारी व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत आहे.वीज वितरण कंपनीने या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली.याबाबतच निवेदनही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे.