सावंतवाडी : प्रजासत्ताक दिनी मळगाव रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी टर्मिनस होण्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची सुरुवात होत असून या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.
स्वर्गीय माजी आमदार जयानंद मठकर यांनी या प्रश्नावरती 2007 पासून आवाज उठवत या प्रश्नी जनआंदोलन उभारलं होतं. काही स्वार्थी लोकांनी याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग केला. आज ते या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. सुमारे 16 वर्ष हा प्रश्न प्रलंबित ठेवला. त्यामुळे पुन्हा हे जनआंदोलन करण्यासाठी शहरातील काही तरुण एकत्र आलेत. यामध्ये स्वर्गीय जयानंद मठकर यांचे नातू मिहीर मठकर, सागर तळवडेकर, सागर नाणोसकर, भूषण बांदिवडेकर, तेजस पोळेकर या तरुण पिढीनं हे शिवधनुष्य उचलल आहे.
ज्यांना समर्थ साथ देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे टर्मिनल्स होण्यासाठी आसपासच्या गावातील लोक तसेच सावंतवाडी शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी सहभागी व्हाव असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.